Saturday, July 26, 2014

“शेती हा फायदेशीर व्यवसाय” - कृषि-व्यावसायिक श्री. मकरंद चुरी यांचे प्रतिपादन


“पन्नास-शंभर रुपयांच्या आंब्याच्या कलमापासून तुम्हाला पुढची कित्येक वर्षं शेकडो आंबे देणारं झाड मिळतं. तुम्ही जमिनीत बियाणेरुपी गुंतवणूक करुन घरी झोपलेले असता, तेव्हा तुमचं शेत तुमच्यासाठी काम करत असतं. पिकांची योग्य निवड व शेतीकडं व्यावसायिक दृष्टीकोनातून बघता आलं तर शेती हा सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरु शकतो,” असे मत ‘निसर्ग-निर्माण’ या संस्थेचे तज्ज्ञ श्री. मकरंद चुरी यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “फाईव्ह-स्टार हॉटेलमधे मिळणार्‍या परदेशी खाद्यपदार्थांसाठी लागणार्‍या एक्झॉटिक भाज्या व फळे पूर्वी आयातच करावी लागत. मात्र, आपल्या जमिनीवर विविध परदेशी भाज्यांच्या उत्पादनाचे प्रयोग करुन आज ऐंशीहून जास्त प्रकारच्या एक्झॉटिक भाज्या व फळे आम्ही स्वतः पिकवतो आणि इच्छुक शेतकर्‍यांना यासंदर्भात मार्गदर्शन करुन व विक्रीची हमी देऊन त्यांच्याकडून वर्षभर उत्पादन करुन घेतो,” असे श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांनी सांगितले. सांगलीच्या भावे नाट्यमंदीरात झालेल्या या कार्यक्रमात श्री. व सौ. चुरी यांनी एक्झॉटिक भाज्या व फळे कोणती, त्यांची बाजारात मागणी किती, त्यांच्या उत्पादनात येणार्‍या अडचणी, त्यावरचे उपाय, आणि या वेगळ्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, या मुद्यांवर सांगलीकरांशी संवाद साधला. शेती करताना, माती परीक्षणापासून शेतीमालाचे मार्केटींग व विक्रीपर्यंत सर्व टप्प्यांवर योग्य मार्गदर्शन व नियोजनामुळे कसा व किती फायदा होते, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणांद्वारे पटवून दिले. पंचवीस वर्षांपासून या कृषि-व्यवसायात काम करणारे श्री. व सौ. चुरी याच विषयावर भारतातील तसेच परदेशातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. “सांगली परीसरात सर्वसाधारणपणे ऊसाकडे नगदी पिक म्हणून बघितलं जातं. पण एक्झॉटिक भाज्यांची लागवड केल्यापासून पंचेचाळीस दिवसांत विक्रीयोग्य माल तयार होत असल्यानं, हीच खरी कॅश क्रॉप्स आहेत,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी, ‘निसर्ग-निर्माण’चे उत्पादन असलेली काही एक्झॉटिक भाजी व फळेही त्यांनी उपस्थितांना बघण्यासाठी उपलब्ध करुन दिली.

कार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्‍यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्‍या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

“पूर्वजांकडून मिळालेला वारसा जतन करण्याची गरज” - प्रसिद्ध वास्तुरचनाकार चेतन रायकर


“आपल्या पूर्वजांप्रमाणे भव्यदिव्य आणि मजबूत वाडे, महाल, किल्ले आपण बांधू शकणार नसलो तर निदान त्यांनी आपल्याकडे सोपवलेला हा वारसा जतन तरी केलाच पाहिजे,” असे मत प्रसिद्ध वास्तुरचनाकार व पुरातन वास्तू संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. चेतन रायकर यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “शंभर-दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान व साधने उपलब्ध नसताना बांधलेल्या भव्य आणि सुंदर वास्तू पाहून, आज आपण अशी निर्मिती का करु शकत नाही, असा प्रश्न पडतो. मग या पुरातन वास्तुंच्या मूळ रचनेला धक्का न लावता तिथे संवर्धन व पुनर्निर्माण करणे अधिकच आव्हानात्मक ठरते,” असे श्री. रायकर म्हणाले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात उध्वस्त झालेल्या मुंबईच्या ताज हॉटेलची पुनर्बांधणी,  पूर्वीचे व्ही.टी. व आताचे सी.एस.टी. या सव्वाशे वर्षे जुन्या वास्तुच्या काना-कोपर्‍यात आढळणारी सुबक कारागिरी, अडीचशे वर्षांपासून फक्त लोड-बेअरिंगवर उभा असणारा इंदोरचा राजवाडा, आणि सिमेंट-काँक्रीटशिवाय नव्याण्णव फूट उंच संगमरवरात बांधलेला हाजी अलीचा मनोरा, अशा अनेक अद्भुत वास्तुंचे दर्शन मल्टीमीडियाच्या माध्यमातून श्री. रायकरांनी सांगलीकरांना घडवले. उत्कृष्ट वास्तुनिर्मिती व काळाच्या पुढचा विचार करुन घडवल्या गेलेल्या इमारतींच्या संदर्भात श्री. रायकर यांनी सांगलीच्या श्री. गणपती मंदीराचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या पुरातन वास्तू आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला त्यांचे महत्त्व लक्षात येत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या वास्तुंचे जतन करण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. “मी ज्या वास्तुच्या संवर्धनाचे वा पुनर्निर्माणाचे काम हाती घेतो, ती वास्तु माझ्याशी बोलते; माझ्या दृष्टीने ती सजीव असते. अशावेळी ताजमहालच्या संगमरवरी भिंतीवर चाकूने ‘पप्पू लव्ह्ज पिंकी’ असे कोरण्याच्या वृत्तीचा भयंकर संताप येतो,” असेही ते म्हणाले. पुरातन वास्तु, किल्ले, मंदीरे यांच्या सौंदर्यास वा रचनेस धक्का पोहोचेल अशी कोणतीही कृती करु नका व इतरही कोणाला करु देऊ नका, असे आवाहन त्यांनी सांगलीकरांना केले. सांगलीतील आर्किटेक्ट, सिव्हील इंजिनियर, बांधकाम व्यावसायिक, तसेच या विषयात रस असणार्‍या नागरिकांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष छायाचित्रे व श्री. रायकरांचे अनुभव कथन यांचा लाभ घेतला. “पुरातन वास्तुंचे महत्त्व, त्यांच्या संवर्धनाची गरज, तसेच हेरिटेज कन्झर्व्हेशन या वेगळ्या क्षेत्रातील संधींची सांगलीकरांना ओळख व्हावी, या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्‍या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Saturday, July 12, 2014

'आरंभ'तर्फे उद्या व्याख्यान - दै. सकाळ

'आरंभ'तर्फे उद्या व्याख्यान
दै. सकाळ, १२ जुलै २०१४

आरंभ फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.१३) पुरातन वास्तूंची देखभाल व एक्झॉटिक भाज्यांच्या उत्पादनासंदर्भात भावे नाट्यमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता चेतन रायकर, मकरंद चुरी, अंजली चुरी यांचे व्याख्यान होणार आहे. संयोजक मंदार शिंदे, राहुल बिरनाळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करुन भागाचा विकास साधण्यासाठी आरंभ फाउंडेशनतर्फे प्रयत्न सुरु आहे. 'अमृतयात्रा' या संस्थेने कार्यक्रमाचे नियोजन केले आहे."


Tuesday, July 8, 2014

'पुरातन वास्तूंबाबत रविवारी व्याख्यान' - दै. पुढारी

पुरातन वास्तूंबाबत रविवारी व्याख्यान
दै. पुढारी, ८ जुलै २०१४

येथील आरंभ फाउंडेशनतर्फे पुरातन वास्तुंची देखभाल व एक्झॉटिक भाज्यांचे उत्पादन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवार, दि.१३ रोजी सांगलीत व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती संयोजक मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी दिली.


Thursday, July 3, 2014

A Green Dream

Her father received seeds of foreign fruits from his friends. As a young girl, she watched her father experimenting with those seeds. Her father was not a scientist, just a small farmer who loved farming. She got into habit of reading rough notes of her father's almost failed experiments. Fifty years later, she has successfully built an innovative business of growing exotic vegetables in almost any soil and under almost any climatic condition. Farming is no more a hobby for her, it's her lifelong passion. Let's watch her sharing her experiences and ideas with farmers of Sangli. Let's hear Mrs. Anjali Churi and her husband, Mr. Makrand Churi talking on their favourite topic - Growing Exotic Vegetables. Who knows, it may become your favourite topic, too. Remember - Sunday, July 13, 2014 at 7:30pm. The place is Bhave Natyamandir, Sangli and entry is free to all. Come, let's become a part of this green dream...

Tuesday, July 1, 2014

हेरिटेज कन्झर्व्हेशन आणि एक्झॉटिक भाज्यांच्या उत्पादनाविषयी व्याख्यान


चाकोरीच्या वाटा सोडून वेगळा मार्ग निर्माण करणारी माणसं समाजापुढं आणणारा कार्यक्रम

वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'

वक्तेः
१. श्री. चेतन रायकर (वास्तुनिर्माण व हेरिटेज कन्झर्व्हेशन)

२. श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी (एक्झॉटिक भाज्यांचे उत्पादन व विक्री)

रविवार, १३ जुलै २०१४, संध्या. ७:३० वाजता
भावे नाट्यमंदीर, सांगली

संपर्कः
 मंदार शिंदे ९८२२४०१२४६
राहुल बिरनाळे ७६२०१०२०३०

Fighting Terrorism... in his own way!

We all talk about terrorism and its threat to our nation. Is there a way for us to fight terrorism at our level? Yes, this man showed us how, without holding a gun, we can fight terrorism. When terrorists attacked Mumbai and severely damaged the beautiful structure of The Taj Hotel, this man rose to the occasion and said, "We will rebuild The Taj, as it was before. Let the terrorists know, for your every act of destruction, we have the guts of re-construction." The man behind successful restoration of The Taj, Mr. Chetan Raikar is coming to Sangli. You can't afford to miss this opportunity to watch him live at our own Bhave Natyamandir on Sunday, 13th of July 2014. Be there to witness his passion towards his profession and towards his nation... our nation!