Thursday, August 16, 2012

चला, आज काहीतरी चांगले करुया...

दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, आजारपण, या एका दिवसात सुटणार्‍या समस्या नाहीत. आर्थिक आणि सामाजिक असमतोल मिटवणे, हेदेखील कठीण काम आहे. पण म्हणजे आपण काहीच करु शकत नाही का? नक्कीच करु शकतो. आपल्यातील प्रत्येकजण काहीतरी करु शकतो. गरज आहे ती सुरुवात करण्याची...आरंभ करण्याची! याच भावनेतून सांगलीतल्या काही उत्साही तरुणांनी आपल्या सामाजिक योगदानाचा आरंभ केला, १५ ऑगस्ट या शुभदिवशी. ‘आरंभ फाउंडेशन’ या नावाने सांगलीतील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या परीने बदल घडवण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी सोडला आहे. समाजातील गरजूंना मदत, सांगली परिसरातील युवकांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न, तसेच शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्यासाठी ‘आरंभ फाउंडेशन’ काम करणार आहे. संस्थेच्या कामाची सुरुवात, गरजूंसाठी जुने कपडे दान करण्याच्या मोहिमेतून करण्यात येत आहे. सांगलीकरांना जुने व वापरात नसलेले कपडे दान करण्याचे आवाहन करून, स्त्री-पुरुष व मुलांचे सुमारे २०० हून अधिक कपडे गोळा करण्यात आले. यापैकी चांगले, न फाटलेले, व स्वच्छ कपडे निवडून गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी ‘आरंभ’चे कार्यकर्ते काम करीत आहेत




No comments:

Post a Comment