Sunday, August 19, 2012

सांस्कृतिक आणि शांततामय गणेशोत्सव


उद्दिष्टेः
१. गणेशोत्सवाचे सांस्कृतिक स्वरूप टिकवून ठेवणे.
२. गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकवारसा जपणे.
३. उत्सवातील हिडीसपणा व उपद्रव कमी करणे.
४. नागरिकांमध्ये सामाजिक जाणीवा जागृत करणे.

सहभागी घटकः
१. गणेशोत्सव मंडळे
२. सांगली पोलिस व प्रशासन
३. सामाजिक कार्य करणार्‍या सेवाभावी संस्था
४. प्रसारमाध्यमे
५. आरंभ फाउंडेशन

कार्यक्रमाची आखणीः
प्रत्येक गणेशोत्सव मंडळाची स्वतंत्र मिरवणूक काढल्यास अनियोजनामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. मंडळांच्या आपसातील स्पर्धेमुळे धोकादायक प्रसंग ओढवू शकतात. तसेच, स्वतंत्र मिरवणुकीसाठी प्रत्येक मंडळाकडे पुरेसा निधी नसल्यास आर्थिक मर्यादा येतात. वेगवेगळ्या गणेश मंडळांची एकत्र मिरवणूक काढल्यास, वेळ आणि पैसे वाचतील, उत्तम प्रकारे मिरवणुकीचे कार्यक्रम घेता येतील, समाज-प्रबोधनासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल. तसेच, विधायक उपक्रमांना प्रोत्साहनही देता येईल.

१. विसर्जन मिरवणूक -
अ) पारंपारिक वाद्यांची पथके - ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक, धनगर ढोल, इ.
ब) वारकरी पथक, प्रबोधनात्मक पोवाडा, पथनाट्य/लोकनाट्य, इ.
क) सामाजिक विषयांवर आधारित बॅनर, पोस्टर, कमान, इ.

२. विधायक उपक्रम -
अ) सहभागी गणेशोत्सव मंडळे निर्माल्य नदीत टाकणार नाहीत याची खात्री करणे.
ब) पर्यावरणाचा विचार करून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्त्या न घेण्याबद्दल प्रबोधन करणे.
क) भयंकर ध्वनिप्रदूषण करणार्‍या डॉल्बी सिस्टीमला मिरवणुकीतून व उत्सवातून हद्दपार करणे.
ड) विसर्जन मिरवणूक व पर्यायाने गणेशोत्सव व्यसनमुक्त / दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे.

आवाहनः
आपल्या सांगली नगरीचे आराध्य दैवत - श्रीगणेशाचा उत्सव सुसंस्कृत व विधायक मार्गाने पार पाडण्यासाठी वरील सर्व घटकांनी एकत्र यावे, असे आवाहन 'आरंभ फाउंडेशन' करीत आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क कराः

राहुल बिरनाळे - ९३२५६०२०३०
मंदार शिंदे - ९८२२४०१२४६

Thursday, August 16, 2012

चला, आज काहीतरी चांगले करुया...

दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, आजारपण, या एका दिवसात सुटणार्‍या समस्या नाहीत. आर्थिक आणि सामाजिक असमतोल मिटवणे, हेदेखील कठीण काम आहे. पण म्हणजे आपण काहीच करु शकत नाही का? नक्कीच करु शकतो. आपल्यातील प्रत्येकजण काहीतरी करु शकतो. गरज आहे ती सुरुवात करण्याची...आरंभ करण्याची! याच भावनेतून सांगलीतल्या काही उत्साही तरुणांनी आपल्या सामाजिक योगदानाचा आरंभ केला, १५ ऑगस्ट या शुभदिवशी. ‘आरंभ फाउंडेशन’ या नावाने सांगलीतील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या परीने बदल घडवण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनी सोडला आहे. समाजातील गरजूंना मदत, सांगली परिसरातील युवकांसाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न, तसेच शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्यासाठी ‘आरंभ फाउंडेशन’ काम करणार आहे. संस्थेच्या कामाची सुरुवात, गरजूंसाठी जुने कपडे दान करण्याच्या मोहिमेतून करण्यात येत आहे. सांगलीकरांना जुने व वापरात नसलेले कपडे दान करण्याचे आवाहन करून, स्त्री-पुरुष व मुलांचे सुमारे २०० हून अधिक कपडे गोळा करण्यात आले. यापैकी चांगले, न फाटलेले, व स्वच्छ कपडे निवडून गरजूंपर्यंत पोचवण्यासाठी ‘आरंभ’चे कार्यकर्ते काम करीत आहेत




Tuesday, August 7, 2012

Let us 'aarambh'...

Poverty, Hunger, Malnutrition...all of us know what the problems are. But what are the solutions? Sharing such photos on Facebook? Criticising the Government in Facebook status updates? Writing STRONG comments below such posts? We don't think so...

We believe in getting on the real grounds, not just on FB walls. We believe in connecting with humans, not just online profiles. We know we may not have 'the ultimate' solution. But we also know that we have 'some' solution!

This Independence Day, let us connect with real humans, let us exchange thoughts and actions, let us start...let us 'aarambh'! Join us in getting back to the roots. Join this initiative by Indians, for Indians! Jai Hind!