कार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
Saturday, July 26, 2014
“शेती हा फायदेशीर व्यवसाय” - कृषि-व्यावसायिक श्री. मकरंद चुरी यांचे प्रतिपादन
कार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment